सगळ नीट करणार, कोणालाही सोडणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण…

या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

या सर्व घडामोडी दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौर्‍यावर होते.त्यावेळी पुणे शहरातील अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अनिकेत देशमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,मी या प्रकरणात लक्ष घातल असून सर्वांना नीट करणार, कोणालाही सोडणार नाही.तसेच या प्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश दिल्याचे यावेळी त्यांना सांगितले.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page